परिचय
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय, मुंबई. महाराष्ट्र शासन यांचा प्रशासकीय विभाग आहे. सध्या प्रभारी माननीय मंत्री, श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील आहेत आणि माननीय राज्यमंत्री, श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर आहेत विभागाचे प्रधान सचिव, श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.) आहेत.
निर्मिती
दिनांक ९ नोव्हेंबर , १९९५ नुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या प्रशासकीय विभागाची निर्मिती झाली.
कामे
राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा करणे, त्यासंबंधीत धोरणात्मक निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छते संबंधित सर्व कार्ये हाताळण्यात येतात.
कार्यक्षेत्र
- पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग (खुद्द) ची आस्थापना, विभागाच्या अधिपत्याखालील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांची आस्थापना.
- पिण्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमांबाबत धोरण ठरविणे, पाणी पुरवठा स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
- पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम राबविणे.
- जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमांचे समन्वयन व संनियंत्रण करणे
विभागाची विषयसूची
संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विषयसूची पाहा.
विभागीय मुख्यालये
मुख्यालय – ७ वा मजला, गोकुळदास तेजपाल रूग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, क्रॉफर्ड मार्केट जवळ, मंत्रालय, मुंबई-४००००१
अधिकृत संकेतस्थळ – http://water.maharashtra.gov.in
क्षेत्रिय कार्यालये
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
- राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर, नवी, मुंबई